ट्रेक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ट्रेक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ३१ ऑक्टोबर, २०१०

` डोक्यालिटी `

             सुट्यांचा मौसम होता. निरर्थक हॉलीवड्पट पाहण्यापेक्षा गाडीला किक मारून रायरेश्वर ला जाण्याचा चंग बांधला होता. मग काय ! मी आणि मयूर दोघेच यावेळी रायरेश्वर-केंजळगड जायचे ठरले. हा बेत ऐनवेळी म्हणजे जायच्या दिवशीच ठरला होता. शनिवारी सकाळी पोटोबाला खुश करून आम्ही भोर कडे कूच केली.नऊ वाजले निघता निघता. साधारण १०० मैलांचे अंतर कापायचे होते. जाताना खेड-शिवापूरला नेहमीप्रमाणे कैलासमध्ये मिसळ आणि मटकी भेळीवर ताव मारला. त्या दिवशीही अमाप गर्दी होती होट्लात.

      भोरला जाईस्तोवर मध्यान: व्हायला आली होती. भोरला आले की पहिला महाराजांचा अश्वारूढ पुतळा दिसतो. महाराजांना वंदन करून भोरमध्ये न थांबता आम्ही थेट कोरले-रायरेश्वर पायथ्याकडे निघालो. कोरले गावाच्या फाट्याला लागल्यावर वाहनांची गर्दी कमी होऊन रस्ता निर्मनुष्य दिसू लागला होता. रस्त्याच्या डावीकडे रोहीडा साद घालत होता. रायरेश्वर अजून नजरेत येत न्हवता. साधारण पाउण तासाभरात आम्ही गावाच्या अलीकडे पोहोचलो असेल. पुढचा रस्ता पार कच्चा होता. आणि न व्हायचे तेच झ्हाले !

            गावाच्या साधारण एक मैल आधी आमची फटफटी झ्हाली पंक्चर !! आता, भर दुपारच्या उन्हात आडगावात फटफटी पंक्चर म्हणजे दुष्काळात तेरावा महिनाच. आजूबाजूला कोणी दिसतही न्हवते. कोणाला विचारायचे म्हणजे गैरसोय. थोडे पुढे तशीच गाडी फरफटत(!) आणावी लागली. समोरून आजोबा येताना दिसले, जीवात जीव आला आमच्या. पण पुढच्याच क्षणी जीव पुन्हा जातोय का काय असे झ्हाले. आजोबा म्हंटले,'' काय र पोरहो, काय करताय इकड ?" मी," आजोबा, रायरेश्वर ट्रेक ला आलोय, पण गाडी पंक्चर झ्हालीये, रायरेश्वर किती लांब आहे अजून? " आजोबानी लगेच समोर हाताने रायरेश्वर कडे खुणावून दाखवत गावात पंक्चर काढण्याचे एकही दुकान नसल्याचे सागितले.


            आइ शप्पथ आता पुरती विल्हेवाट लागायाची पाळी आली. नशीब, रायरेश्वर पायथ्याला तरी पोहोचलो होतो आम्ही. डावीकडे केंजळगड तर उजवीकडे रायरेश्वर हाक देत होते पण काय करणार ? विचारातून बाहेर येत मी समोर पाहिले; आजोबा पुढे म्हणाले, पुढ गावात सायकल पंक्चर काढणारा एक इसम मिळेल, तुम्हाला काही मदत करू शकला तर पहा. अस म्हणून ते बाजूच्या वाटेने शिवारात निघून गेले. आमच्यासमोर दुसरा काही पर्याय न्हवता. पुन्हा त्याच कच्या वाटेने फटफटी ढकलत गावात आणली. सायकल पंक्चर काढायचे दुकान कुठे ? मयूरने गावात खेळणाऱ्या पोरांना दुरूनच विचारले. पडयालल्या लाइनतल्या कोपऱ्याचे पहिले घर, लगेच एका पोराचा रीप्लाय.



              आता पूर्ण मी घाम्याघुम होऊन त्या घरापाशी पोहोचलो. 'आहे का कोणी इथे? 'मयूर. आतून तिशी ओलांडलेले एक गृहस्थ आले. आम्ही,' पंक्चर कुठे काढून मिळेल ?' त्यांनी गाडी बाजूला लावायला सांगितली. पुढे जे काही होणार होते त्याची मी कल्पनाही केली न्हवती. पंक्चर काढणारे काका म्हणाले,' गावात गाडीचे पंक्चर काढायची व्यवस्था नाही'. आम्ही सायकल पंक्चर ला लागणारे हत्यारे ठेवतो. बोला काय करायचे ? पंक्चर काढा-आम्ही म्हणालो. विचार करा, त्यांच्याकडे हिटर, कॉम्प्रेसड एयर, स्पेशल ग्लू, रबर स्टिक ही बेसिक साधनसामुग्री नसताना त्यांनी आम्हाला पंक्चर काढून दिले.


               त्यांच्या कडची साधनसामुग्री होती, सायकल च्या चाकातली हवा भरायचा पंप, पाना, चिकटपट्टी सदृश स्टिकी गोल आणि पुरे पूर मदतीची इछा ! पंक्चर काढून झ्हाल्यावर काकांनी आम्हाला भोरला इथूनच परत जायचा सल्ला दिला. कारण एकतर गाडीचे हे शास्त्रशुद्ध पंक्चर काढलेले नाही हे त्यांनी मान्य केले होते, गाडी पुन्हा पंक्चर होऊ शकते. आणि दुसरे वर किल्यावर जाणारा रस्ता पारच खडकाळ आहे अस ते म्हणाले. इतक्या लांबून इतक्या जवळ येऊन आम्ही काही परतणार न्हवतो. काकांना थ्यांक्यू म्हणत गावातून आम्ही गाडीवर बसूनच सावकाश पुढे निघालो.


             गावातून वर म्हणजे गडावर जायला दोन रस्ते आहेत. दोन्ही पुरते खडकाळ. आम्ही वर जाताना रायरेश्वर कडच्या रस्त्याने वर आलो. आल्यावर गाडी पार्क करून रायरेश्वर शिडी मार्गाच्या पाशी पोहोचलो. दुपारचे तीन वाजले होते.फोटोगिरी सुसाट चालू होतीच. पूर्वी शिडी मार्ग न्हवता इथे. दगडाच्या खोबणीत हात-पायांची कसरत करत चढायला लागायचे. भोर आणि मुख्यत्वे रायरेश्वर ला इतिहासात फार मोलाचे स्थान आहे. भोर ऐतिहासिक मंदिरासाठी प्रसिद्ध आहे तर रायरेश्वरवर इथे शिवमंदिरात शिवाजी महाराजांनी सोळाव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ आपल्या मावळ्यानबरोबर घेतली होती.

   
              आम्ही शिडीमार्गाने वर आल्यावर थेठ शिवमंदिरात गेलो. शिव शम्भुनसमोर नतमस्तक होऊन शिवरायांचे स्मरण केले. रायरेश्वर किल्ल्यावर तुरळक लोकवस्ती आढळते. हे लोक शेती आणि गुरे पालनाचा व्यवसाय करतात. आणखी एक खास गोष्ट म्हणजे हे रायरेश्वर चे विस्तीर्ण पठारच आहे, सहा एक मैल त्याचा विस्तार असावा. किल्ला म्हंटला तरी तटबंदी आलीच. रायरेश्वर ला बुरुज किवा तटबंदी दिसत नाहीत. वर शाळाही आहे. इथे मंदिरात राहायची तर खालून गावातून खाण्याची व्यवस्था होऊ शकते. वर चिक्कार पाणी आहे. आणि हो, पांडवलेणी ही आहेत किल्ल्यावर. पावसाळ्यात हे पठार फुलांच्या गालिच्याने भरून जाते. इथून तोरणा, राजगड, रोहीडा, पुरंदर, वज्रगड, केंजळगड, पांडवगड, वैराटगड दृष्टीस पडतात. गोमुख तळे, अस्वलखिंड, भेक्राचा माळ ही आणखी काही किल्ल्यावरची पाहण्यासारखी ठिकाणे.


           शाळेबाहेरच्या कट्यावर आम्ही भेळ चापत निघायचं ठरवल. साडे चार वाजले होते. आम्ही केंजळगडाला वेळेअभावी जाऊ शकलो नाही. मात्र उतरताना केंजाळ गडाकडल्या रत्याने पुन्हा एकदा कोरले गावात आलो. आणि काय आश्चर्य पुन्हा एकदा आमची फटफटी पंक्चर ! यार अब तो हद हो गयी थी. पुन्हा पंक्चर वाल्या काकाकडे जाऊन पंक्चर काढावे लागले. यावेळी मागचे चाक पंक्चर होते. पण काही म्हणा ही जी काय गावरान डोक्यालिटी होती पंक्चर काढायची ती खरच अफलातून !!! नाहीतर आमच्या सारख्या भटक्यांचे काय झ्हाले असते कुणास ठाऊक ??? आता मात्र काकांना सलाम करत पुण्याचा रस्ता धरला.

            जाताजाता आम्ही आंबवडे ला जीवा महल समाधी पाशी गेलो.गावकऱ्यांनी स्वखर्चातून समाधी व्यवस्थित ठेवल्याचेपाहून उर भरून आला. समाधी समोर नतमस्तक होत मनातल्या मनात शूरवीर जीवा महालांचा प्रताप आठवत आम्ही निघालो. आंबवडेलाच स्थापत्यकलेचा नमुना असेलेला ब्रीटिशकालीन ससपेनशन ब्रिज ही पाहिला. सात वाजले होते संध्याकाळचे.


~ ~ ~ ~ ~ ~ दोन पंक्चर झ्हाले. पन्नास रुपये......ओ सायेब कसला विचार करताय ? अ...अ कसला नाही म्हणत पन्नासची नोट मी पंक्चर काढणाऱ्या पोराच्या हातावर थापत रायरेश्वर आठवणीतून बाहेर येत गाडीला किक मारली आणि घराकडे कूच केली..

मंगळवार, २८ सप्टेंबर, २०१०

` ट्रेकिंगशी जुडले नाते ! `

             ट्रेकिंग म्हंटल की पहिल डोळ्यासमोर येतो 'सह्याद्री'. मानवजातीवर देवाने केलेले उपकार म्हणजे 'सह्याद्री'. ट्रेकर्सचा गुरु, दोस्त, वाटाड्या आणि कैक म्हणजे 'सह्याद्री'. सह्याद्रीतले ट्रेकिंग हा खरतर महाराष्ट्रातल्या बहुत माननीय व्यक्तींनी हाताळलेला विषय. तरीही माझे काही स्वैर, अल्प काही अलिखित आणि काही सर्वश्रुत फायदे प्रस्तुत लेखात मांडत आहे.
खरय, ट्रेकिंग म्हणजे फक्त शरीराचा व्यायाम न्हवे तर हा एक सर्वोत्तम मार्ग आहे की जेणेकरून तुम्ही-आम्ही निसर्गाशी बिनधास्त एकरूप होतो. तुम्ही नियमित ट्रेक करता, याचा अर्थ तुम्ही जग अधिकाधिक सुंदर बनविण्याचा प्रयत्न करता.


#
वजनावर   ताबा ...                                                                                                                                            लठठपणा ही जाणकार डॉक्टरांच्या निकषानुसार एकदम सर्वत्र फैलावलेली तापदायक बाब आहे, जी दुर्दैवी गोष्ट आहे. भारतात सरासरी ४०% जादा वजन असलेला प्रौढ वर्ग आहे आणि १०% हून अधिक लठठपणाग्रस्त वर्ग आहे. आजच्या दैनंदिन जीवनात ज्याला बैठे काम आहे असा, बसून बराच वेळ घालवणारा, आंतरजालावर तासनतास घालवणारा, दुखी: सामान्य माणूस लठठपणा सारख्या व्याधीला बळी पडला जातोय हेच तथ्य. हे कुठेतरी कमी करायचे असेल तर उठा, ट्रेकिंगला निघा ! जाळून टाका शरीरातली अनावश्यक कैलरीज !

 #
हृदयरोग मुक्ती...
२५०० पेक्षाहून अधिक लोक दररोज हृदयविकाराने दगावतात. म्हणजे तुम्ही आत्ता हे वाचताय आणि १ व्यक्ती मरण पावतेय. सर्व पान वाचेपर्यंत पाच व्यक्ती मरण पावतील. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला हृदय विकार आहे आणि तुम्ही नियमित ट्रेक करावा. नियमित ट्रेक जो पहिल्यापासून करतो त्याला हृदयविकार क्वचितच होतो.

 #
कोलेस्ट्रोल ताबा...
ट्रेकिंगमुळे एच.डी.एल ( हाय डेनसिटी लिपोप्रोटीन ) म्हणजेच उपयुक्त कोलेस्ट्रोल अपायकारक कोलेस्ट्रोलपासून मुक्त करायला मदत होते. मोबदल्यात हृदयविकाराची शक्यता आपोआप कमी होते.

 #
रक्तदाबावर ताबा...
साधारण तीस मिनिटाच्या छोट्या ट्रेकला जर तुम्ही रोज गेला तर मिळवले. जेणेकरून रक्तदाब कमी होऊन शरीराचा निरोगीपणा वाढण्यास मदत होते.

 #
औदासीन्य आणि तणाव मुक्ती...
शरीरातली नैसर्गिक रासायनिक द्रव्य एंडोर्फिन और एड्रेनालाईन सोडली जातात ज्यामुळे तणाव पातळीवर प्राकृतिक सकारात्मक प्रभाव पडण्यास मदत होते.

 #
दिर्घायुषी व्हा...
तुम्ही म्हातारे होत असला तर कमजोरी वाढत जाते, पण नियमित ट्रेकिंग मुळे कमजोरी कमी राहते. जसेजसे वय होते, तसेतसे तुम्हाला शारीरिक कमजोरी सहन करायची चिंता राहताच नाही.

 #
ऑस्टियोपोरोसिस रोख...
ट्रेकिंगमुळे हाडाचे घनत्व आणि ताकद वाढते. जेणेकरून कैल्शियम नुकसान कमी होते आणि हाडे अधिकाधिक दणकट होतात.

 #
स्वछछ हवा...
प्रदूषणापासून दूर मोकळ्या हवेत ट्रेक करून तर पहा, स्वर्गीय आनंद यापेक्षा काय असे म्हणाल !

 #
मधुमेह नियंत्रण...
ट्रेकिंगमुळे इंसुलिनच्या एकंदर संख्या मधुमेह प्रकार एक कमी करू शकतात.

 #
पाठीच्या यातनावर ताबा...
एकाच जागेवर कंप्यूटर बसून बसल्याने पाठीच्या दुखनीला बाले पडावे लागू शकते. जाणकार व्यक्तीच्या मते, चालण्यामुळे पाठीच्या यातना कमी होतात. म्हणूनच ट्रेकिंगमुळे शरीरावर एरोबिक्स किवा इतर व्यायामापेक्षा कमी ताण पडतो जेणेकरून मूळ शरीरातली शक्ती निर्माण व्हायला मदत होते.

 #
संपूर्ण शरीराचा व्यायाम...
ट्रेकिंगमुळे पायातले स्नायू, मुख्य शरीरातील स्नायू, फुप्फुस यांचा वापर होऊन पूर्ण शारीरिक धडधाकटपणा सुधारण्यास मदत होते.

 #
निसर्ग अनुभवा...
 ट्रेकर्स नैसर्गिक रचनांचा शोध लावण्यासाठी अज्ञात प्रदेशात प्रवास करतात जिथे फक्त पायच पोहोचू शकतात. व्यस्त शहरी जीवन आणि प्रदूषण यांना काही काळ दूर ठेवण्याचा यापेक्षा उत्तम पर्याय तो काय !

 #
आत्मविश्वास वृद्धी...
जसेजसे नवीनतम ट्रेक करत जाता तसेतसे तुम्हाला आत्मविश्वास येत जातो की चला आपण पुढल्यावेळी मोठा ट्रेक आखायचा. याचा परिणाम, कितीही वाईट हवामान परीस्थिती जरी आली तरी सामोरे जायला निर्भीड होता.

#
पाया बांधणी...
ट्रेकिंगमध्ये जर तुम्ही निष्णात झ्हालात तर क्षितीज आणखी विस्तारते. जसे की प्रस्तरारोहण, कातळारोहण, बाकपाकिंग, पर्वतारोहण आणि सलग्न इतर साहसी गतिविधि.

 #
विचार बदला जग बदलेल...
 ट्रेकिंग कम भटकंती तुम्ही वर्षभरातून केव्हाही करू शकता अगदी कोणत्याही ऋतूत. विश्वास नसेल तर एकच ट्रेक तुम्ही वर्षात वेगवेगळ्या ऋतूत करून पहा, मग तुम्हाला अनुभव येईल जग किती सुंदर आहे.

 #
उत्साहवर्धन आणि नियमित सुखी जीवन.....
प्राकृतिक वातावरणात ट्रेकिंगच्या निमित्ताने वेळ घालवल्यास मनोवैज्ञानिक प्रभाव सकारात्मक और मजबूत पडतो. हा अमूल्य वेळ तुम्हाला वास्तविक जीवन आणि कामाच्या ठिकाणी आणखी जोमाने काम करायला प्रवृत्त करतो.

###
चला तर मग छत्रपती शिवरायांचे स्मरण करून ट्रेकला निघुयात !!!


तळटीप -
संदर्भ : बेनिफिट्स ऑफ हायकिंग - शमीर ललानी  
छायाचित्र १ : गूगल साभार 
 
footer


??ा?ी? ?ि?ि?्?ा?ा?ी ??ी? ??ा?्?ा? ?ु??ा ??्? ?ा?ा.