गुरुवार, १९ ऑगस्ट, २०१०

` आमची शाळा !`


शाळा म्हटल की विद्यार्थी, शाळा म्हटल की शिक्षक,

शाळा म्हटल की वर्ग, शाळा म्हंटल की तास,

शाळा म्हंटल की अभ्यास, शाळा म्हंटल की परीक्षा,

शाळा म्हंटल की शिक्षा, शाळा म्हटलं की फजीती,

शाळा म्हंटल की क्रीडांगण, शाळा म्हंटल की खेळ,

शाळा म्हंटल की मजा, शाळा म्हंटल की रजा,

शाळा म्हटलं की दोस्ती, शाळा म्हंटल की मौजमस्ती,

शाळा म्हंटल की आठवणी, शाळा म्हंटल की आपुलकी,

शाळा म्हंटल की अमुल्य, शाळा म्हंटल की अभिमान,

शाळा म्हंटल की निरोप, शाळा म्हंटल की पुन्हा एकदा गाठी भेटी !!!




            १५ ऑगस्टचे औचित्य साधून कर्मवीरच्या माजी टाळक्यांनी भेटीचा बेत आखला. आंतरजालावरून टाळक्यांना दोन दिवस आधीच आमंत्रण पाठवले होते. तब्बल आठ वर्षांनी आंम्ही शाळेत भेटणार होतो. भलताच उत्साह संचारला होता.नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजता झेंडावंदनाच्या ठीक पाच मिनिट आधी मी शाळेत हजर झ्हालो होतो. लांबच्या लांब अगणित टाळक्यांच्या नेटक्या रांगा मंचासमोर लागल्या होत्या.त्यांना आदरणीय गुरुजन मंडळी हटकत होते. एकसाथ सावधान सूचना ऐकताच मीही आपोआपच सावधान स्थितीत गेलो होतो.  विशाल आणि उपेंद्र मला सामील झ्हाले होते. राष्ट्रगीताला सुरुवात ज़्हाली, सर्वांनी झेंड्याला मानवंदना देत राष्ट्रगीत गायले. तोवर अनंत, रोहित, राहुल सामील झ्हाले होते. दर वर्षीप्रमाणे शाळेत व विद्यापीठात कार्यक्रम होतो. राष्ट्रगीत ज़्हाल्या वर प्राचार्यान्चे भाषण् झ्हाले. त्यानंतर सर्व टाळकी विद्यापीठातल्या होणाऱ्या मुख्य कार्यक्रमासाठी रवाना झ्हाली.आम्ही तिकडेच थांबून जुने दिवस आठवत होतो.दुरूनच वर्ग हेरत होतो. शाळेत असताना केलेल्या करामतीवरून हसत होतो.त्यात आमचे मास्तरही होतेच.हश्मी उशीरा सामील झ्हाला होता. काही वेळ फोटोगीरी गेली. क्षणभर आजची शाळांची परिस्थिती डोळ्यासमोर आली.आजकाल शाळा हा बराच मोठा बर्निग इशु झ्हाला आहे न्हवे राजकारणाचा विषय झ्हाला आहे.खरे पाहायला गेले तर असे म्हणता येईल की शाळा हे शैक्षणिक कारखाणे झ्हाले आहेत. आपल्या रोजमर्याच्या वस्तू उत्पादन करणारे स्वायत्त कारखाणे एका बाजूस आणि अमर्याद खर्च करवून उद्याचे नागरिक बनवणारे शैक्षणिक कारखाणे एका बाजूस. कितीही काही झ्हाले तरी शाळा ही प्राथमिक गरजे इतकीच महत्वाची असते हे काही वेगळे सांगायला नको. गप्पा इतक्या रंगल्या की दोन तास कधी उलटून गेले कळलेच नाही. जुन्या आठवणीतून बाहेर येत निघायची वेळ आली होती.पुन्हा इथच भेटायचा असा संकल्प सोडत घराचा रस्ता धरला.

शुक्रवार, ६ ऑगस्ट, २०१०

` मुक्काम पोस्ट - मढेघाट ! `

          मढेघाटात भटकंतीचा बेत तसा अचानकच ठरला. मागल्या आठवड्यात रविवारी पावसाने उघडीक दिली होती. दोन दिवस बरसून आज मस्त उन पडले होते. दुचाकीवरून मढेघाटात भटकायचा करायचा विचार केला. आमच्या अभ्यासाला आज सुट्टी होती. मग काय ? दुचाकीवरून सकाळी आठ वाजता प्रस्थान केले नेहमीप्रमाणे मी, माझी फटफटी ! मढे घाटात जायचा किडा तसा खूप पूर्वीचा, आज तो शांत होणार होता. भरल्या पोटी घरातून निघालो, फटफटीचे चे पोटही जवळच कात्रज पेट्रोल पंपावर भरवले.

           पुण्यापासून साधारण पंच्याहत्तर कि.मी अंतरावर असलेल्या मढे घाटात खडकवासल्याहून जायला रस्ता आहे. निघालो त्यावेळी नेहमीप्रमाणे सिंहगडावर जाणाऱ्या जनतेची गर्दी सिंहगड रोडला होती. शहरापासून खानापुरात पोचोस्तोवर दहा वाजले होते. रस्ता मोकळा होता. माझ्या फटफटीने वेग धरला आणि पाबे घाटाचा रस्ता धरला. त्यानंतर अर्ध्या तासात पाबे खिंडीत पोचलो. समोर दूरवर राजगड आणि उजवीकडे तोरणा दिसला. धुक्यात हरवून गेलेले ! पाउस रिमझिम चालू होती. फोटोगिरी करून पाबे गाठले. छोटेसे गाव अगदी कोकणात आल्य्सारखे वाटते. तिथून वेल्ह्यात गेलो. वेल्ह्यापर्यंत रस्ता ठीकठाक होता.
          पुढे साधारण दोन तीन कि.मी रस्ता खराब होता. आता केळद पुढचा थांबा होता. एव्हाना पुन्हा एक छोटासा घाट लागला. पूर्ण धुके होते घाटात, मस्त ढगातून रायडींग केल्याचा अनुभव होता. वाटेत गुराखी भेटले, त्यांना केळदला जायचा रस्ता कन्फर्म करून पुढे निघालो. हा छोटा घाट संपल्यावर आणखी एक छोटा घाट लागतो आणि मग केळद गाव. केळद पर्यंत चारचाकी आरामात येते.
          मढे घाट पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सिमेवर आहे. घाटाला इतिहासात विशेष महत्व आहे. कोंढान्यावरच्या लढाइत अमर झ्हालेल्या सुभेदार तानाजी मालुसरे याचे पार्थिव याच घाटातून त्यांच्या जन्मगावी म्हणजे उमरठ ला नेण्यात आले होते. म्हणून हे नाव 'मढे'घाट. मढे घाट हा ट्रेक रूट नेहमीच भटक्याना साद घालत आलेला आहे. या वाटेने शिवथरघळ, वरंध, कावळा, रायगड ट्रेक करणारे भटके अमाप आहेत. इथली आणखी एक खासियत म्हणजे मनमोहक 'कारवी फुले' जी सात किंवा आठ वर्षातून एकदाच फुलतात ती मढे घाटात पाहायला मिळतात. समुद्रसपाटीपासून सतराशे फुटावरून कोसळणारा धबधबा ही मढे घाटाची शान !    
                      
          केळद वरून घाटात जायला पायपीट करावी लागते. हा दोन एक कि.मी चा कच्चा रस्ता आहे. पावसाळ्यात तर लालेलाल चिखलाने भरून जातो. तशीच मी दुचाकी चिखलातून काढत पुढे घाटात येऊन धडकलो. बारा वाजायला आले होते. खाली कोकणात हाच कच्चा रस्ता जातो. तो वापरात नाही. इथून कोकणात महाडला रस्ता करण्यात येणार असल्याचे ऐकिवात आहे. घाटात धबधबा कोसळतो तिथे छोटेसे पठार आहे. तिथून दूरवर कोकण नजरेत भरतो. फोटोगीरीसाठी एकदम परफेक्ट जागा ! पुण्यातली जनता इथेही होती.   
          डावीकडे वरंध घाटात कोसळणारे धबधबे दुरून पांढरी रेषाच दिसत होते. धुक्याचा आणि पावसाचा पाठशिवणीचा खेळ पाहत तासंतास बसावेसे वाटले. क्यामेरयात ते क्षण साठवून परतीची वाट वाट धरली. येताना वेल्ह्यात जेवण केले. संध्याकाळ झाली होती पार घरी येईपर्यंत. केळद, मु.पो मढे घाट आपला पत्ता असावा क्षणभर वाटून गेले !!!
 
footer


??ा?ी? ?ि?ि?्?ा?ा?ी ??ी? ??ा?्?ा? ?ु??ा ??्? ?ा?ा.