मंगळवार, २८ सप्टेंबर, २०१०

` ट्रेकिंगशी जुडले नाते ! `

             ट्रेकिंग म्हंटल की पहिल डोळ्यासमोर येतो 'सह्याद्री'. मानवजातीवर देवाने केलेले उपकार म्हणजे 'सह्याद्री'. ट्रेकर्सचा गुरु, दोस्त, वाटाड्या आणि कैक म्हणजे 'सह्याद्री'. सह्याद्रीतले ट्रेकिंग हा खरतर महाराष्ट्रातल्या बहुत माननीय व्यक्तींनी हाताळलेला विषय. तरीही माझे काही स्वैर, अल्प काही अलिखित आणि काही सर्वश्रुत फायदे प्रस्तुत लेखात मांडत आहे.
खरय, ट्रेकिंग म्हणजे फक्त शरीराचा व्यायाम न्हवे तर हा एक सर्वोत्तम मार्ग आहे की जेणेकरून तुम्ही-आम्ही निसर्गाशी बिनधास्त एकरूप होतो. तुम्ही नियमित ट्रेक करता, याचा अर्थ तुम्ही जग अधिकाधिक सुंदर बनविण्याचा प्रयत्न करता.


#
वजनावर   ताबा ...                                                                                                                                            लठठपणा ही जाणकार डॉक्टरांच्या निकषानुसार एकदम सर्वत्र फैलावलेली तापदायक बाब आहे, जी दुर्दैवी गोष्ट आहे. भारतात सरासरी ४०% जादा वजन असलेला प्रौढ वर्ग आहे आणि १०% हून अधिक लठठपणाग्रस्त वर्ग आहे. आजच्या दैनंदिन जीवनात ज्याला बैठे काम आहे असा, बसून बराच वेळ घालवणारा, आंतरजालावर तासनतास घालवणारा, दुखी: सामान्य माणूस लठठपणा सारख्या व्याधीला बळी पडला जातोय हेच तथ्य. हे कुठेतरी कमी करायचे असेल तर उठा, ट्रेकिंगला निघा ! जाळून टाका शरीरातली अनावश्यक कैलरीज !

 #
हृदयरोग मुक्ती...
२५०० पेक्षाहून अधिक लोक दररोज हृदयविकाराने दगावतात. म्हणजे तुम्ही आत्ता हे वाचताय आणि १ व्यक्ती मरण पावतेय. सर्व पान वाचेपर्यंत पाच व्यक्ती मरण पावतील. याचा अर्थ असा नाही की तुम्हाला हृदय विकार आहे आणि तुम्ही नियमित ट्रेक करावा. नियमित ट्रेक जो पहिल्यापासून करतो त्याला हृदयविकार क्वचितच होतो.

 #
कोलेस्ट्रोल ताबा...
ट्रेकिंगमुळे एच.डी.एल ( हाय डेनसिटी लिपोप्रोटीन ) म्हणजेच उपयुक्त कोलेस्ट्रोल अपायकारक कोलेस्ट्रोलपासून मुक्त करायला मदत होते. मोबदल्यात हृदयविकाराची शक्यता आपोआप कमी होते.

 #
रक्तदाबावर ताबा...
साधारण तीस मिनिटाच्या छोट्या ट्रेकला जर तुम्ही रोज गेला तर मिळवले. जेणेकरून रक्तदाब कमी होऊन शरीराचा निरोगीपणा वाढण्यास मदत होते.

 #
औदासीन्य आणि तणाव मुक्ती...
शरीरातली नैसर्गिक रासायनिक द्रव्य एंडोर्फिन और एड्रेनालाईन सोडली जातात ज्यामुळे तणाव पातळीवर प्राकृतिक सकारात्मक प्रभाव पडण्यास मदत होते.

 #
दिर्घायुषी व्हा...
तुम्ही म्हातारे होत असला तर कमजोरी वाढत जाते, पण नियमित ट्रेकिंग मुळे कमजोरी कमी राहते. जसेजसे वय होते, तसेतसे तुम्हाला शारीरिक कमजोरी सहन करायची चिंता राहताच नाही.

 #
ऑस्टियोपोरोसिस रोख...
ट्रेकिंगमुळे हाडाचे घनत्व आणि ताकद वाढते. जेणेकरून कैल्शियम नुकसान कमी होते आणि हाडे अधिकाधिक दणकट होतात.

 #
स्वछछ हवा...
प्रदूषणापासून दूर मोकळ्या हवेत ट्रेक करून तर पहा, स्वर्गीय आनंद यापेक्षा काय असे म्हणाल !

 #
मधुमेह नियंत्रण...
ट्रेकिंगमुळे इंसुलिनच्या एकंदर संख्या मधुमेह प्रकार एक कमी करू शकतात.

 #
पाठीच्या यातनावर ताबा...
एकाच जागेवर कंप्यूटर बसून बसल्याने पाठीच्या दुखनीला बाले पडावे लागू शकते. जाणकार व्यक्तीच्या मते, चालण्यामुळे पाठीच्या यातना कमी होतात. म्हणूनच ट्रेकिंगमुळे शरीरावर एरोबिक्स किवा इतर व्यायामापेक्षा कमी ताण पडतो जेणेकरून मूळ शरीरातली शक्ती निर्माण व्हायला मदत होते.

 #
संपूर्ण शरीराचा व्यायाम...
ट्रेकिंगमुळे पायातले स्नायू, मुख्य शरीरातील स्नायू, फुप्फुस यांचा वापर होऊन पूर्ण शारीरिक धडधाकटपणा सुधारण्यास मदत होते.

 #
निसर्ग अनुभवा...
 ट्रेकर्स नैसर्गिक रचनांचा शोध लावण्यासाठी अज्ञात प्रदेशात प्रवास करतात जिथे फक्त पायच पोहोचू शकतात. व्यस्त शहरी जीवन आणि प्रदूषण यांना काही काळ दूर ठेवण्याचा यापेक्षा उत्तम पर्याय तो काय !

 #
आत्मविश्वास वृद्धी...
जसेजसे नवीनतम ट्रेक करत जाता तसेतसे तुम्हाला आत्मविश्वास येत जातो की चला आपण पुढल्यावेळी मोठा ट्रेक आखायचा. याचा परिणाम, कितीही वाईट हवामान परीस्थिती जरी आली तरी सामोरे जायला निर्भीड होता.

#
पाया बांधणी...
ट्रेकिंगमध्ये जर तुम्ही निष्णात झ्हालात तर क्षितीज आणखी विस्तारते. जसे की प्रस्तरारोहण, कातळारोहण, बाकपाकिंग, पर्वतारोहण आणि सलग्न इतर साहसी गतिविधि.

 #
विचार बदला जग बदलेल...
 ट्रेकिंग कम भटकंती तुम्ही वर्षभरातून केव्हाही करू शकता अगदी कोणत्याही ऋतूत. विश्वास नसेल तर एकच ट्रेक तुम्ही वर्षात वेगवेगळ्या ऋतूत करून पहा, मग तुम्हाला अनुभव येईल जग किती सुंदर आहे.

 #
उत्साहवर्धन आणि नियमित सुखी जीवन.....
प्राकृतिक वातावरणात ट्रेकिंगच्या निमित्ताने वेळ घालवल्यास मनोवैज्ञानिक प्रभाव सकारात्मक और मजबूत पडतो. हा अमूल्य वेळ तुम्हाला वास्तविक जीवन आणि कामाच्या ठिकाणी आणखी जोमाने काम करायला प्रवृत्त करतो.

###
चला तर मग छत्रपती शिवरायांचे स्मरण करून ट्रेकला निघुयात !!!


तळटीप -
संदर्भ : बेनिफिट्स ऑफ हायकिंग - शमीर ललानी  
छायाचित्र १ : गूगल साभार 

रविवार, १२ सप्टेंबर, २०१०

... तख्त ए हिंदुस्तान

            मागच्या महिन्यात दिल्लीला जाण्याचा योग आला. कामाच्या निमित्ताने प्रथमच दिल्लीला जाणार होतो, एका दिवसाचा बेत होता. मंगळवारी पाहाटेच किंगफीशरने लोहगावरून मला घेऊन थेट दिल्लीकडे झ्हेप घेतली होती. दोन तासात दिल्लीत इंदिरा गांधी विमानतळावर पोहोचलो. हवाइप्रवासात मजा (!) आली होती. पूर्ण प्रवास नयनरम्य (!) झ्हाला होता. पहिले लग्न कामाचे म्हणंत लगेच विमानतळाच्या बाहेर येत भिकाजी कामा प्यालेस ला जाणारी चारचाकी पकडली. इ आय एल च्या ऑफिस ला पोहोचलो. सेटल झ्हालो आणि आलेल्या कामाला लागलो. साधारण पाचच्या सुमारास काम आटपले. आमची परतीची फ्लाइट त्याच दिवशी रात्री नऊ वाजता होती. चार तास होतो. आज पहाटे तीन वाजता उठल्या पासून आतापर्यंत खूप रश झ्हाली होती. तरीही आलोय दिल्लीत तर लाल किल्ल्यावर जाऊनच येउयात असा विचार मनात आला. इ आय एल मधून व्यवस्थित काम आटोपून किल्ल्याकडे जाणारी रिक्षा धरली. पाऊन तासात तिथे येऊन धडकलो, एकशे दहा रुपये मोजून. जाताना दहा जनपथ वरून आम्ही गेलो. वाटेवरच बड्या राजकीय लोकांच्या निवासाची स्थाने दिसली जी आतापर्यंत न्यूज वाहिन्यांवर पाहत आलो होतो. इंडिया गेट, यु पी एस सी भवन, हाय कोर्ट, राष्ट्रापती भवन रिक्षातूनच पाहिली. वेळ कमी होता. लाल किल्ल्याच्या दिल्ली दरवाजापाशी आलो. वीस रुपये देऊन तिकीट काढले आणि आत शिरलो. मुख्य दरवाजातून आत गेल्यावर आणखी एक भव्य दरवाजा दिसतो. त्याच्यावरचे नक्षी काम सुरेख होते.


           बरोबर दहा वर्षापूर्वी झ्हालेल्या भ्याड हल्ल्यामुळे किल्ला आता पोलीस तळ झ्हाला होता. शस्त्रधारी पोलीस किल्ल्याच्या अनेक ठिकाणी दिसत होते. आत किल्याचा विस्तार इतका मोठा आहे की त्या काळी ३००० लोक राहत असत. लाल किल्याशी भारताचा खूप मोठा इतिहास सलग्न आहे. आणखी पुढे गेल्यावर नगार खाण्याची देखणी इमारत लक्ष वेधून घेते. न्याशनल जीओग्राफिक वाहिनीचे काही विदेशी लोक तिकडे त्यांचा क्यामेरा लाऊन शूट करत होते. नगार खाण्यातून सरळ दिवान ए आम मधे आपण पोहोचतो. दिल्लीचे तख्त ते हेच ! कैक बादशहानी हे तख्त काबीज करायला अनेक चांगली आणि वाईट कामे केली याचा इतिहास साक्षीदार आहे. इथूनच बादशहा हुकुम जारी करायचे. सूनवाई इथूनच व्हायची. इथेच शिवाजी महाराजांनी सरेआम औरन्गजेबास ललकारले होते. तो झ्हारोखा आता बंद होता. माझी फोटोगिरी सुरु होती. सूर्यास्त होत आला होता. आम्ही अर्ध्या तासात दिवान ए खास, नहर ए बेह्शात, झ्हीनाना, हयात बक्ष बाग पाहून पुन्हा विमानतळाकडे निघालो. सात वाजले होते. विमानतळावर येईस्तोवर आठ वाजून गेले होते. चेक इन करेस्तोवर साडेआठ झ्हाले. एकदाचा विमानात बसलो. सकाळपासून सुरु झ्हालेल्या घोडदौडीला जरा विराम बसला. आम्ही सव्वा तास लाल किल्ल्यात असू. या सव्वा तासात संपूर्ण लाल किल्ला एक्स्प्लोर करता आला नसला तरी भारताचे ऐतिहासिक तख्त पाहिल्याचे सुख होते. क्यामेरात टिपलेले फोटो पाहण्यात मी मग्न झ्हालो आणि विमानाने पुण्याकडे प्रस्थान केले.

बुधवार, १ सप्टेंबर, २०१०

` नागफणी वसुल ! `

            पुण्याच्या आसपास भटकंतीची अशी बरीच ठिकाणे आहेत जिथे पुणेकर जसा वेळ मिळेल तसे हमखास जाऊन येतातच ! पण अशीही काही वसुल अनामिक ठिकाणेही आहेत जिथे किमान एकदा तरी जाऊनच यायला हवे ! खंडाळ्याच्या घाटातला 'ड्युक्स नोज' चा सरळसोट सुळका त्यापैकीच एक ! अगदी पुणे-मुंबई प्रवासात खंडाळा घाटातून जाताना डावीकडे कोकणात कोसळताना दिसणारा हा कातळ म्हणजे 'ड्युक्स नोज'. नाव जरा विचित्रच. विंग्रजी लोकांचा उपद्व्याप दुसरे काय ? नाहीतर हा सुळका 'नागफणी' नावाने सर्वश्रुत आहे. भीमाशंकराच्या इलाक्यातही 'नागफणी' आहे. नाव साधर्म्याने बर्याचदा गफलत होते माझी ! राजमाची वारीत नेहमी खुणावणारी नागफणी अखेर सर करून आल्यावर माझे गेल्या काही वर्षांचे अपूर्ण तप सफल झ्हाले होते. झ्हाले असे, पेपर वाचत एका रविवारी बसलो होतो. गिरीदर्शनचे ड्युक्स नोज चे निवेदन वाचले. तत्क्षणी ड्युक्स नोज चा बेत पक्का केला. नागफणी म्हंटले की जनता किती बेफाम होते ते त्यादिवशी समजले. रविवारी साधारण सात च्या आसपास टाळकी पुणे स्टेशन ला जमली होती. सकाळी सहाच्या सिंहगड एकसप्रेसने खंडाळ्याला जायचे होते. तिथून धबधब्याच्या रस्त्याने नागफणी. पाउस अजिबात न्हवता, तरीही वातावरण सुखद होते. रेलवेतच सर्वाकडून विकासने सेल्फ रिस्क एक्सेप्टन्स फॉर्म भरवून घेतला. रविवारचा दिवस, त्यात पावसाळा, जनता पुरेपूर उत्साहात होती. दोन तासातच गाडी खंडाळ्यात येऊन धडकली.


            खंडाळा पूर्ण धुक्यात गेलेले होते. आम्ही स्टेशन वर जरा सैरसपाटा मारला. स्टेशन वर काहीच गर्दी न्हवती. गिरीदर्शनचे सर्वेसर्वा सतीश मराठे नागफणी डोंगुर त्या दिवशीच्या नागफणी ट्रेक चे तिथेच ब्रीफिंग केले. नाश्ता, चहा आटोपून फोटोगीरीचा श्रीगणेशा केला. त्यानंतर घोषणा देण्यात आली, "प्रौढ प्रताप पुरन्दर क्षत्रिय कुलवंतास सिंहासनधिशवर छत्रपती शिवाजी महाराज की जय! " मागोमाग आम्ही आक्रमण !!!.... म्हणत नागफणी कडे कूच केली होती. नागफणी भटकंतीसाठी दोन पर्याय आहेत. पहिला सोइस्कर आणि सोपा मार्ग म्हणजे लोणावळ्याला यायचे, तिथून कुरुवांडे गावाला, पायी टाटा तलावाला वळसा घालून पोहोचायचे. रस्ता डांबरी आहे, चारचाकीनेही जाता येते. तिकडून अर्ध्या तासात नागफणी माथा ! काही भटके आला त्याच रस्त्याने उतरतात तर काही दुसऱ्या बाजूने खंडाळ्यात.


            पण जर तुम्हाला धबधबा वजा ट्रेक वजा नयनरम्य निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर दुसऱ्याशिवाय पर्याय नाही. त्याच वाटेवरून आम्ही गेलो. खंडाळा स्टेशनवरून मुंबईला जाणाऱ्या रेल रूट आम्ही धरला. पहिल्या बोगद्याच्या अलीकडे डावीकडे एक पायवाट लागते. तिथून वर गेले की मोहक बंगल्यांची रांग लागते. अजून जरा पुढे गेले की डावीकडे डोंगरात जाणारी पायवाट लागते. बास, तुम्ही बरोबर आलात ! गेल्या काही वर्षात नागफणी भटकंती करायला आलेले पण वाट चुकून जंगलात हरवलेले भटके आठवले की खूप वाईट वाटते. इतका आटापिटा करून ज्यासाठी आलो तो नागफणी चे दर्शन अजून काही होत न्हवते. सर्व टाळकी पुढे चालू लागली होती. हा परिसर मोसमात गर्द हिरवाइने वेढलेला होता. मस्त दाट जंगलच ! काही अंतरावरच धबधबा ! उजवीकडे दिसणारा खंडाळ्याचा विस्तृत परिसर !


            धुके, पाउस, उन यांचा लपंडाव पहात तासभर कसा गेला ते कळालेच नाही. पुन्हा एकदा दाट झ्हाडी, दहा मिनिटांच्या चढाइ नंतर छोट्या पठारावर येऊन पोहोचलो. डोळ्याचे पारणे फेडणारा समोरचा नजार पाहून मी थक्क झ्हालो होतो. समोर दूरवर नागफणीच्या सुळक्यावर उन्हाचा एक आकाशातून प्रकाशझोत पडला होता. बाकी आजूबाजूला धुके होते. आता नागफणी वर कधी एकदा पाय ठेवतोय असे झ्हाले होते. पुढे निघालो, पुन्हा पठार लागले पण विस्तीर्ण होते. इकडे आमच्या आधी येऊन ठेपलेल्या असंख्य भटक्यांची जमातच होती. व्ह्याली क्रोसिंग करून नागफणीवरून येथे उतरता येते एवढे विस्तृत पठार आहे. या पठारावरून समोर दूरवर प्रदेश दिसत होता. डावीकडे नागफणी आणि नागफणीला जोडूनच असलेले डचेस नोज साद घालत होते.


           मनमुराद फोटोगिरी करीत आणखी एक तास उलटला. माथ्यावर पोहोच्यान्यासाठी आता जरा कष्ट घ्यावे लागणार होते. पहिल्या दोन उभ्या दगडातल्या चढाइ नंतर डचेस नोज च्या माथ्यावर पोहोचलो होतो. डचेस नोज अगदी निमुळते ! त्याच्या टोकाला तर जेमतेम एक माणूस उभा राहील एवढीच जागा ! काही हौशी, धाडसी टाळकी तिथे फोटोगिरी करीत होती. नागफणी चा उभा कडा आता स्पष्ट दिसू लागला होता. दुपारचे दोन वाजून गेले होते. माथ्यावर जनता होती. पाउस शमला होता. धुकेही कमी झ्हाले होते. पाच मिनिटात नागफणी माथ्यावर पोहोचलो.


        
           ती जागाच अप्रतिम होती. प्रशस्त जागा होती. माथ्याच्या टोकाला अन्यथा कुठेही उभारून नजर टाकली की सृष्टीचे खुलून आलेले रेखीव निसर्ग चित्र दिसत होते.बेधुंद वारा आणि इवलेसे पाण्याचे थेंब हळूच मनतरंग उठवून पुढे सरकत होते. पूर्ण ३६० अंशात कुठे नजर पडली तरी तासंतास पाहवा असा देखावा तो ! माथ्यावर असलेल्या महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. दोन्ही बाजूला कड्यावर पाय सोडून टाळकी बिनधास्त बसली होती. पायथ्या पासून सुमारे साडे आठशे फुट इतका उंच असलेल्या नागफणीवर आरोहक मंडळींचे अमाप प्रेम ! अनेकांनी त्याचा साधारण तीनशे फुटांचा कडा हातासरशी सरही केला आहे !



             सतीश मराठे आम्हाला राजमाची, कोरीगड, सुधागड, सरसगड, लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर, माणिकगड, माथेरान दुरूनच हाताने खुणावून दाखवत होते. फोटोगिरी थांबवून पोटोबाला खुश केले. परतीचे वेध लागले होते. पुन्हा एकदा माथ्यावर उगीचच रपेट मारून घेतली आणि परतीचा मार्ग धरला. आम्ही उतरताना कुरुवांडे गावातून उतरलो. तिकडून थेठ लोणावळा गाठले ! सर्व टाळकी येईस्तोवर जाता येणार न्हवते. डुलकी काढली काहीकाळ. आठच्या दरम्यानची लोकल पकडून दहापर्यंत घरी पोहोचलो होतो.

                                  आता नवे तप सुरु झ्हाले होते, ' नागफणी कातळारोहणाचे !' ...

छायाचित्रे : जी.टी.सी
 
footer


??ा?ी? ?ि?ि?्?ा?ा?ी ??ी? ??ा?्?ा? ?ु??ा ??्? ?ा?ा.